Monday, July 4, 2011

(Dis)connecting India...

"भारत संचार निगम लिमिटेड" चे "भेदभाव संचार निगम लिमिटेड" झाले, महत्वाचे पाउल उचलले गेले.चांगली गोष्ट आहे. सरकार जाती-भेदासाठी फार महत्वाची पावले उचलत आहे. BSNL ने OBC to OBC Free अशी सुविधा उपलब्ध केली आहे. थांबा, सविस्तर देतो.

http://www.esakal.com/esakal/20110704/4700594298586467547.htm
अशी आहे योजना
ओबीसींमधील व्यक्‍तीला बीएसएनएलचे एक सीमकार्ड मोफत दिले जाईल व त्यांचा समावेश विशिष्ट ग्रुपमध्ये केला जाईल. या ग्रुपमधील लोकांना ग्रुपअंतर्गत (सीयूजी) कॉल मोफत असेल. तसेच प्रतिमहा 90 रुपये रिचार्ज केल्यानंतर 100 मिनिटे बीएसएनएल नेटवर्कसाठी; तर 200 मिनिटे इतर कंपन्यांच्या नेटवर्कसाठी "फ्री टॉकटाइम' मिळणार आहे. महिनाभरात 250 एसएमएस मोफत व 100 एमबी जीपीआरएस सेवा मोफत मिळणार आहे.
-ई-सकाळ

हे पाउल महत्वाचे आहेच, पण मी या पुढची अपेक्षा करतो आहे. BSNL ने या सुविधेत "रंगारी, भावसार, शिंपी, साळी, तेली, परीट, नाभिक, सुतार, लोहार, आतार, बागवान, कासार, झुल्लीया, माळी, कोळी, धनगर, बंजारा, वंजारी, गुरव, गवळी, जैन, कोष्टी आदींसह 357" जातीचा समावेश केला आहे. यामुळे हेतू पूर्ण साध्य होणार नाही. त्यपेक्षा थोडी सुधारणा करून या जाती-जातींना वेगवेगळ्या योजना द्याव्यात.
जाती-ग्रुप अंतर्गत फुकट फोन, तर ग्रुप-ग्रुप मध्ये २-२ रुपये calling rates ठेवावेत. यांत म्हणे ३५७ जाती आहेत. आम्हाला तर कल्पनाही नव्हती कि हिंदू धर्मात एवढ्या जाती आहेत.प्रथम सरकारचे मनोमन आभार कि त्यांनी हि माहिती पुरवली.
हो, अजून एक. मराठा आणि ब्राह्मण यांचा यात नक्कीच समावेश असणार नाही. तर मराठा-ब्राह्मण, ब्राह्मण-ब्राह्मण आणि मराठा-मराठा याच्यांत calling ३-३ रुपये एका मिनिटाला, तर मराठा, ब्राह्मण यांना जर OBC ना call लावायचा असेल तर ५-५ रुपये ठेवावेत. जेणेकरून हेतू लवकर सध्या होईल. आणि तरीही जे मित्र जाती बाहेर आपापसांत call करतील त्यांच्यामुळे तिजोरीत पैसे जमा होऊन अजूनही काही योजना आखता येतील.

BSNL नंतर इतर सगळ्या कंपन्यांनीही हे पाउल लवकरच उचलावे. फोन पुरत्या या योजना मर्यादित न राहता इतरही त्या राबवाव्यात. त्याचीही नितांत गरज आहे.
माझ्या डोक्यात काही आयडियाच्या कल्पना आहेत...
१. दुकान - ब्राह्मण-मराठ्यांना BC, OBC, NT वगैरेंच्या दुकानात चढ्या भावाने वस्तू विकल्या जाव्यात.
२. पेट्रोल - पेट्रोल चे दरही वेगवेगळे असावेत.
३. सार्वजनिक सेवा - बस, पोष्ट यांतही काही योजना राबवाव्यात.
४. खेळ - आपले माननीय रामदासरावजी आठवले साहेब यांनी क्रिकेट खेळामध्ये आरक्षणाची अभिनव योजना मांडली होती (असे ऐकिवात आहे.), दुर्दैवाने ती पुढे गेली नाही. तसा प्रयत्न इतर खेळांसाठीही केला पाहिजे.
५. खाजगी कंपन्या - इथे मोठ्ठ्या प्रमाणात जात-निर्मुलन होत आहे. इथे एकाच Cubicle मध्ये वेगवेगळ्या जाती-धर्माचे लोक बसतात, एकत्र काम करतात. अहो, एवढेच काय जेवायलाही एकत्र जातात, हे कमी म्हणून कि काय एकमेकांच्या डब्यातलेहि खातात यामुळे जाती-भेद खुपच कमी होत आहे... हरे राम!!!
सावरकर आदि मंडळींच्या जाती-भेद निर्मूलनाच्या प्रयत्नांना यश येणार कि काय? नाही, पण देव बघतो आहे. त्याने आपल्याला उत्तम सरकार नेमून दिले आहे, ते "जातीने" प्रयत्न करत आहेत. ते जाती-भेद निर्मूलनाचा दुष्ट प्रयत्न नक्कीच साध्य होऊ देणार नाहीत. आता मात्र वेळ आली आहे सगळी कडे आरक्षणाची, वेगवेगळ्या जातीनिहाय योजनांची हे सरकारने ताडले आहे असे दिसत आहे... सरकार जोरदार प्रय्तन करत आहे आणि त्यांना यश हे येणारच यांत शंका नाही.

एक महत्वाची गोष्ट राहिलीच. सार्वजनिक स्वच्छतागृहे. तिथे तर जात विचारतही नाहीत भेद तर सोडाच... त्याहीपेक्षा महत्वाचे, कुठेही कसले संकट आले कि सगळे लोक जाती-धर्माचा विचार न करता जातात वेड्यासारखे मदतीला. यामुळे जाती-भेद कमी होत आहे.
असो, माझ्याकडे खूप योजना आहेत, सरकार त्या राबवू शकते.

सध्या थांबतो. फक्त एकच, हि नवी "OBC to OBC Free" योजना फक्त महाराष्ट्रापुरतीच आहे असे वाचले, तरी ती इतर राज्यातही सुरु करावी असा सल्ला. आणि खूप खूप शुभेच्छा!!!