Tuesday, June 13, 2017

संप विद्यार्थ्यांचा!

परिसर: महाराष्ट्र शिकवणी केंद्र, अर्थात शाळा
मुख्याध्यापक: फडणवीस मास्तर
काळ: विद्यार्थी संपकाळ
विद्यार्थ्यांनी समस्त शिक्षणमंडळाविरुद्ध संप केलेला आहे. परीक्षेत पेपर व्यवस्थित तपासले जात नसल्याने समस्त विद्यार्थी नाराज आहेत. तर अभ्यास करायचा कंटाळा म्हणून नापास होणारे विद्यार्थी परीक्षेच्याच विरोधात.

अभ्यासू विद्यार्थ्यांच्या मागण्या:
१. पेपर व्यवस्थित तपासले जावेत
२. योग्य मूल्य आकारून अभ्यासिका उपलब्ध करून दिली जावी.
३. शालेय बसची व्यवस्था रास्त दरात करावी.
४. पेपर तज्ञ लोकांकडून तपासून योग्य उत्तरला बरोबर गुण मिळावेत. उत्तर योग्य असूनही गुण कमी मिळत आहेत त्यात सुधारणा हवी.
५. ज्या वर्षी पेपर फारच कठीण निघाला असेल तर ४-५ गुणांची सुट मिळावी.

अभ्यासू विद्यार्थ्यांच्या नाराजीच्या तव्यावर पोळ्या भाजण्यासाठी तयार संघटना:
१. पवार आगलावे: म्होरक्या प्रचंड हुशार. डोक्यात किडेच किडे. काही काळापूर्वी मुख्याध्यापक म्हणूनही काम केलेले. पण विद्यापीठाचा कुलुगुरू होण्याची दुर्दम्य इच्छा केवळ गांधी परदेसवाले यांनी "हात" मधे घातल्याने पूर्ण झालेली नाही, त्यामुळे रात्रंदिवस तळमळ.
आग लावण्यात हातोटी. बुद्धीकौशल्यावर मुर्ख, अडाणी लोकांची मजबूत उभारलेली संघटना. सध्याच्या शिक्षण मंडळावर डूख. नाना तऱ्हेने मुख्याध्यापक फडणवीस यांना पाडण्यासाठी डाव रचण्यात सध्याचा काळ जात आहे.
२. आढाव मर्कट संघटना: संघटना कौशल्यापोटी माकडांची टोळी जमा करून भुरटेगिरी करण्यात हातखंडा. सुपाऱ्या घेऊन संप, विध्वंसक कामे करणे यात हातोटी. स्वतःची विचार-बैठक नसल्याने आगलावी संघटनेकडून मिळणाऱ्या सुपाऱ्यावर पोट.
जोडीला उद्धव बाण Manufacturing, शेट्टी विद्यार्थी संघटना, खेडेकर-कोकाटे हिंसा-अश्लीलता-विध्वंस कोचिंग क्लासेस अश्या अनेक संस्था-संघटना, काही चांगल्या विद्यार्थी संघटना ज्यांना वैचारिक बैठक नाही त्यामुळे शिक्षण मंडळाविरोधात विद्यार्थी कल्याणाच्या दृष्टीने सामील.
बाकी आगलावी, मर्कट अश्या अनेक संघटनांना ना विद्यार्थ्यांची चिंता, ना शिक्षकांची, ना विद्यार्थ्यांच्या ज्ञानामुळे समाजाला होणाऱ्या फायद्याची चिंता. उद्देश फक्त मुख्याध्यापकाला पाडण्याचा. जेणेकरून शाळेसाठी मिळणारा पैसा खाता येईल. त्यामुळे ह्या संघटनांचा उनाड/फुकट्या विध्यार्थ्यांना पाठींबा. वास्तविक आगलावी संघटनेचा म्होरक्या मुख्याध्यापक होऊन गेलेला. शिक्षण खात्याचा प्रचंड अनुभव. पण सगळी हयात पैसे खाण्यात, घोटाळे करण्यात गेलेली आणि समाज काय, विद्यार्थ्यांकडेपण दुर्लक्ष. पण याचा सध्या सोयीस्कर विसर पाडून ठेवलेला. रड नुसती सध्याचे शिक्षण मंडळ काही करत नाही ह्याचीच. गेले ६० वर्ष शिक्षण खाते "हातात" असूनही आपण काहीही केलेले नाही ह्याचा समाजाला पाडलेला विसर.
वेळोवेळी विद्यार्थ्यांना किती भयानक अभ्यास करावा लागतो, गुण मिळतच नाहीत, बसच खराब, पेपरच कठीण नाहीतर पुस्तकेच दिसायला चांगली नाहीत वगैरे अनेक समस्या मीठ-मसाला लाऊन समाजात जाणीवपूर्वक अश्या पसरवलेल्या की विद्यार्थी हे एकटेच काय ते समाजात जगण्यास लायक आणि बाकी सगळे त्यांच्या जीवावर जगणारे फुकटे अशी भावना करून दिलेली.
अर्थातच विद्यार्थ्यांकडे जराही बोट दाखवायची सोय नाही. बरं ह्या सगळ्या विद्यार्थांत ८०% विध्यार्थी खरच अभ्यासू, मेहनती आणि परीक्षेत चांगले गुण मिळवून स्वतःची आणि त्यातून मिळालेल्या ज्ञानाने समाजाची प्रगती करायची मनीषा बाळगून असणारे. त्यामुळे समाज कृतज्ञ. पण २०% विद्यार्थी टवाळक्या करणारे, भाई-गुंड लोक, आधीच श्रीमंत आणि उपद्रवी. हेच विद्यार्थी अभ्यासाच्या नावाखाली नुसता शाळेत गोंधळ घालण्यासाठी येणारे आणि ना उरलेल्या विद्यार्थ्यांना सुखाने जगू देणारे ना शिक्षकांना.
अभ्यासू-मेहनती विद्यार्थी मात्र ह्या सगळ्यात गोंधळलेले, शाळेत शिकायचे असल्याने फुकट्या विद्यार्थ्यांनी आणि संघटनांनी पुकारलेल्या संपात सहभागी. त्यापैकी काहींनी मेहनतीने लिहिलेले पेपर संपाच्या नावाखाली फुकट्या लोकांनी रस्त्यात फाडून टाकलेले, फक्त सहानुभूती मिळवण्याच्या उद्देशाने.
खरं तर अभ्यासू विद्यार्थ्यांचे ह्यात नुकसानच. त्यांना परत अभ्यास करावा लागणार, परीक्षा द्यावी लागणार! पण पेपर फाडण्याने सगळीकडे सहानुभूती मिळालेली, नेते लोक पेपरला आग लावणे, फाडणे ह्यात दंग. त्यांचे सेल्फी फेमस.
अभ्यासू विद्यार्थ्यांच्या मागण्या रास्त. त्यावर मुख्याध्यापक आणि शिक्षण मंडळ चर्चेने तोडगा काढायला तयार. पण फुकट्या विद्यार्थ्यांना परीक्षाच नकोत, वर अधिक कोरेच ठेवलेल्या पेपरमध्ये सुद्धा पास करावे अशी मागणी. अभ्यासिका, स्कूल-बस सगळे फुकट हवे. आणि त्यातही शाळेत येऊन अभ्यास न करता हे लोक गोंधळच घालणार! वर मग परत रडायला तयार, परीक्षा लिहिता येत नाही म्हणून. काही ठिकाणी तर अभ्यासू विद्यार्थ्यांनी लिहिलेले पेपर बळजबरीने फाडतानाचाही पुरावा जाहीर, पण तिकडे कानाडोळा.
मुख्याधापाकांना तर शाळेची चिंता. दुसरा लायक मुख्याध्यापकही नाही. त्यांना तर विध्यार्थी सांभाळायला हवेत पण परीक्षा रद्दच करणं हा मार्ग चुकीचाच ह्यावर कसा तोडगा काढायचा ह्याची चिंता.
तातडीने बैठक झाली, दिवस गेला, रात्र गेली परीक्षा रद्द करण्याचे सोडून बाकी सगळ्या मागण्या मान्य केल्या गेल्या. गुण भरघोस देण्याचे आश्वासन गेले. अभ्यासिका, स्कूल-बस योग्य दरात दिली. विद्यार्थी अभ्यासू असतील तर पास करण्याचेही ठरले. अभ्यासू विद्यार्थी खुश झाले, संप मिटल्याचे जाहीर झाले.
पण फुकटे नाराज, त्यांना अभ्यास करायचाच नव्हता. परीक्षाच रद्द करा हा हट्ट, प्रचंड मनुष्य बळावर पुन्हा संप. ह्यावेळी नाईलाजाने हीही मागणी मान्य करावी लागली. मग संप संपल्याचे जाहीर झाले. समाजाचा जीव भांड्यात पडला.
पण आगलावी संघटनेचा म्होरक्या कुठे होता? कुठे होती सगळी संप घडवून आणणारी डोकी? ती विध्वंसक डोकी तर केव्हाच पुढच्या हालचालीला लागली होती.
तयारी चालू झाली होती पुढच्या संपाची!!!

टीप: वरील गोष्ट पूर्णपणे काल्पनिक असून त्यातल्या कोणत्याही नावाचा, संघटनेचा कसलाही कोणताही कशाशीही संबंध नाही. जर काही जुळून आल्यास समाजात असे विध्वंसक लोक खरच आहेत असे समजावे, उगाच माझ्या गोष्टीला जबाबदार धरू नये. जाब त्यांना विचारावा, मला नाही.