Wednesday, April 13, 2011

जाती -जमाती II

"अहो रिक्षावाले" हि अजून एक जमत सगळी कडे सापडते. ("अहो" म्हणा असे explicitly काही रिक्षांच्या मागे लिहिलेलेच असते.) हि जमात बहुसंख्यांक जमातीत मोडते.
ह्यात २ उप-जमाती आहेत. ३ चाकी आणि ६ चाकी वाले. ३ चाकी मधल्या २ उप-उप जमाती नंतर बघू.

६ चाकी वाल्यांना "टमटम" असेही नाव आहे. जाती-जाती अंतर्गत जसे मतभेद असतात तसे याही जमातीत असल्याने आणि थोडे 'अल्पसंख्यांक' गटात असल्याने 'टमटम' वाल्यांना पुणे शहरात बंदी आहे.
जर तुम्ही बाहेरगावातून पुण्यात आलात तर तुमचे स्वागत रिक्षावालेच करतात. तुम्ही तुमच्या बसमधून direct त्यांच्या रीक्षेतच पाय ठेवावेत यासाठी ते न्यायला आलेल्या एखाद्या नातेवाईकापेक्षा अधिक तत्परतेने तुमचे सामान घेत "चला शिवाजी-नगर, ष्टेशन, ष्टेशन " ओरडत असतात. जर तुम्ही "नको, अमकं-तमकं न्यायला येणारे" वगैरे म्हणालात तर अतिशय तुच्छ कटाक्ष टाकून लगेच दुस-या 'गि-हाईकाकडे' वळतात. दुर्दैवाने तुम्हाला रिक्षा करावीच लागली तर "कस्सा सापडला" असे भाव तोंडावर येऊन ५ वाजायला अजून २० मिनिटं आहेत, हे बघत लांबच्या रस्त्याने बरोब्बर ४:५५ ला पोचवतात. दीडपट भाडे वसूल करून आनंदात त्यांची सुरुवात झालेली असते.
मग दिवसभर अश्याच आनंदात लोकांना घुमवत भाडे वसूल करत असतात.
ठिकाण कोणतेही असो, ह्या जमातीच्या लोकांत फार फरक नसतो. अंगात मुरलेला माजोरडेपणा, कसेही-कुठेही भांडायची सवय, कमालीचा निर्लज्जपणा आणि नियम मोडण्याकडे असलेला कल हे गुण असले कि धंदा चांगला चालतो. नाहीतर रिक्षा फार चालत नाही.
"एक न्हावी दुस-या न्हाव्याच्या दाढीचे पैसे घेत नाही म्हणतात" त्याप्रमाणे वाट्टेल तशी रिक्षा फेकताना, नियम मोडताना, "हम सब एक" होऊन एकमेकांची साथ देत असतात. रिक्षावाले कधीही एकमेकांत भांडत नाहीत, traffice rules तोडल्यावरून.
६ चाकी वाले रस्त्यात अचानक थांबणे, आपल्या वाहनाची आसन-क्षमता १५ आहे असे समजून एखादा जास्त या नात्याने माणसे कोंबणे, वाहनाचे suspension BMW किंवा 'हमर' सारखेच आहे असे समजून कितीही मोठ्ठ्या खड्ड्यातून वाट्टेल तशी रिक्षा पळवणे असले प्रकार करत असतात.
३-चाकी रिक्षावाले आपल्या वाहनाला पुढे एकाच चक असले तरी पार्श्वभागी २ चाके आणि त्यानुसार आकार आहे हे विसरून ते वाहन "हाणत" असतात. रस्त्यावर traffic मध्ये "आपल्याला जाता नाही आले तरी बेहत्तर, पण दुस-याला जाऊ द्यायचे नाही" हे ब्रीदवाक्य भूषवतच पुढे सरकत असतात.
या ३ चाकी मधेही उप-उप जमत असते. "मीटर" रिक्षा आणि "शेअर" रिक्षा. पुण्यात शेअर रिक्षावाल्यांना जास्त थारा नाही. आणि शहराबाहेर टमटम असतेच. रत्नागिरीत हे मोठ्याप्रमाणात सापडतात.
"मीटर" वाले हे सामान्यतः "फलाणा-फलाणा" अध्यक्ष असलेल्या बोर्डाखाली तासंतास आपापल्या वाहनात झोपून अथवा गप्पा 'झोडत' असतात. ह्यांचे standard च वेगळे असते. त्या-त्या ठिकाणाच्या नेहमीच्या लोकांकडे (आणि हे लोक ह्या रिक्षावाल्यांकडे) हे ढुंकूनही बघत नाहीत. मुख्यतः शहरातले नवखे लोक हे ह्यांचे लक्ष असते. साधी-साधी ५० गि-हाईके घेण्यापेक्षा मोजकीच पण पैसेवाली गि-हाईके हेरून "बडा" हात मारण्याकडे ह्यांचा कल असतो.
ज्या शहरात शेअर रिक्षा वाले असतात त्यांना हे मीटर वाले "त्यांच्या" एरियात फिरकू देत नाहीत. "मीटर" मागे कुठल्या ना कुठल्या संघटनेचे बळ असते. त्यामुळे गि-हाईक आणि शेअर वाल्यांमध्ये पैसे ठरले तरी मीटर वाले, गि-हाईक आणि शेअर दोघांनाही हुसकून लावतात आणि "गळ" टाकून शांतपणे झोपतात.
हि भांडणे जाती अंतर्गत असतात. गि-हाईकाशी सगळेच तुच्छतेने वागतात. 'शेअर' वाले थोडे नारामाईत असू शकतात. ते दिवसभर कष्ट करत असतात. "सीट" जमवणे हा उद्योग अविरतपणे चालू असतो.
पण हे शेअर वाले कधीही गि-हाईकाला जिकडे जायचे तिकडे वाहन वळवत नाहीत. त्यांचे destination ठरलेले असते. ते आधीच मुळी "ष्टेशन ला येणार का?" असे फिरायला नेणार असल्याच्या थाटात विचारतात.
पुण्यासारख्या शहरात हे शेअर वाले नसल्याने हि कामगिरी मीटर वाले पार पडत असतात. कधीही विचारा, "स्वारगेट?" उत्तर "नाही!"... रिक्षा हे वाहन रस्त्यावर लावल्यास मनपा वाले उचलून नेत नाहीत, त्यात झोपता येते किंवा अड्डा जमवून गप्पा मारता येतात म्हणूनच रस्त्यावर घेऊन यायचे असा त्यांचा कदाचित समज असावा.

३ चाकी रिक्षावाले सगळे 'तिरके' बसतात नाहीतर त्यांना license देत नसावेत.
"तिरके" बसण्यावरून परवाच एक विनोद वाचला. एका रिक्षावाल्याचे लग्न असते. त्यावेळी पाटावर "तिरके" बसून तो वधूला सांगतो, "ताई, थोडं सरकून घ्या कि अजून एक सीट बसेल!!!" ;)

Wednesday, April 6, 2011

जाती-जमाती I

जाती -जमाती म्हटलं कि ज्वलंत चर्चा, मतप्रवाह डोळ्यासमोर येतात... आपण "त्या" जाती-जमाती बाजूला ठेऊ...
त्या जाती-जमातींमध्ये फुट पाडणे, कलह निर्माण करणे, त्यावर राजकारण करणे वगैरे कामे आपली नाहीत... त्याकडे सरकारचे लक्ष आहेच...
त्यात ढवळाढवळ कशाला करा...

वाहतूक विषयांत सुद्धा जाती-जमाती असतात... गाडी चालवताना मीटर-मीटर ला याचा अनुभव येत असतो...
ह्यातलीच एक जमात आपण बघू... कारण हि जमात फक्त 'बघावी', ह्यांच्या 'वाटेला' कुणीही जाऊ नये.

साधारणपणे गाडीच्या दोन्ही बाजूला पाय सोडून traffic मधून वाहन हाकायचा प्रयत्न करणारी व्यक्ती दिसली कि ओळखावे, हि जमात नं. १ आहे.
हि जमात ओळखायला सोपी असते, निदान पुण्यात तरी. अंगावर वयो आणि वस्तुमानानुसार कमी-अधिक कपडे असले तरी तोंड मात्र अफगाणी अतिरेक्यांप्रमाणे गुंडाळून घेतलेले असते.
(पुण्यात बहुतेक बाल्यावस्थेत असतानाच ह्यांना दुपटं गुंडाळतानाच, आई 'हे' फडकं गुंडाळायचे शिकवत असावी)
पंजाबी ड्रेस हे मागासलेपणाचे आणि कुंकू-टिकली हे सांस्कृतिक असभ्यतेचे लक्षण मानणारी हि जमात (बहुतांशी) असल्याने मुलगे आणि ह्यांच्यात भिन्नता दर्शवणारे, तोंडावर फडके आणि दोन्ही बाजूला सोडलेले पाय हे दोन महत्वाचे धागे आहेत.

एक म्हण आहे, "शिंप्याच्या उजव्या हाताला आणि गाढवाच्या मागे" कधी उभं राहू नये." तसेच PMT, रिक्षा आणि ह्या जमातीतील व्यक्तींमागे, पुढे, उजव्या, डाव्या... थोडक्यांत कुठल्याच बाजूला राहू नये.
ते पूर्णतः धोकादायक ठरू शकते, ती व्यक्ती सोडून सगळ्यांना.

रस्त्यावरचा अलिखित नियम आहे. ट्रक आणि (लहान) चारचाकी, चारचाकी आणि दुचाकी, दुचाकी आणि सायकल, सायकल आणि पादचारी... यांच्यामध्ये काही प्रेमळ संवाद घडला तर सगळ्यांची सहानुभूती दुस-यालाच मिळते, चूक कोणाचीही असो-नसो.
आपलीही हि जमात कायम सहानुभूती मिळवणार्यांमध्ये मोडते आणि मग public आपापले विविध कारणांवरचे राग 'दुस-यावर' काढून त्याची पाठ आणि वाहनही मोडते.

कधी ह्या जमातीच्या मागे वाहन चालवण्याचा योग आलाच, तर काही सावधानता बाळगावी लागते. ह्या व्यक्तीने कधी उजव्या बाजूचा signal दिलाच तर ती नक्की डाव्या बाजूलाच वळणार किंवा सरळच जाणार अशा भ्रमात राहू नये. चुकून उजव्याच बाजूला वळण्याचीही शक्यता असते. तेव्हा सावधानतेने परिस्तिथी न हाताळल्यास शेजारच्या public चे मनोरंजनाचे साधन बनू शकता.
साधारणपणे ह्या व्यक्तीने ब्रेक लावल्यासारखे करायला किंवा speed कमी करायला सुरुवात केली कि हि व्यक्ती तीन-चारशे मीटर वर जाऊन कुठेतरी थांबणार असे गृहीत धरायला हरकत नसते...
अश्या वेळी "नियम आहे", म्हणून उजव्या बाजूनेच overtake करायचा धसमुसळेपणा न करता परिस्तिथीचा अंदाज घेऊन गाडी हाकावी लागते. समोरच्या व्यक्तीच्या अचानक ब्रेक लावण्यानेही तुम्ही स्वतःची गाडी पद्धतशीरपणे आडवी करून बसू शकता... फडक्यातून दोन डोळे उगीचच मग "काय साधी गाडी चालवता येत नाही" अश्या अर्थाने लुकलुकतात...

ह्या जमातीत २ उपजमाती आहेत.ह्यातली एक अत्यंत सतर्क आणि दुसरी exactly विरुद्ध असते.
ह्यातल्या सतर्क व्यक्ती ह्या "१०० मीटर" सतर्क असतात. म्हणजे सधारण १००-१५० मीटर पुढे काही घडणार असे "वाटून" ह्या किंकाळी मारून मागील लोकांना सतर्क करतात, आपल्या सतर्कतेने पुढील १००-१५० मीटर वरचा प्रकार टळला असे समजून आनंदात असताना, त्याच सतर्कतेमुळे मागे १०० मीटर वर काही घडले आहे हे ह्यांच्या गावीही नसते.
उलट ह्यांच्या विरुद्धची उपजमात शांत असते. आपल्याच "कूर्म"गतीने नश्वर जगाकडे दुर्लक्ष करत आपापले वाहने "हाकणे" कि क्रिया शांतपणे करत असतात. Helmet घातल्याने आणि १०-१५ च्या गतीने वाहन हाकत असल्याने मागील लोकांचे horn आणि शिव्या ह्यांच्या कर्णेंद्रियापर्यंत पोचून ह्यांची शांतता भंग करू शकत नाहीत...


हि जमात "बघताना" निरुपद्रवी वाटणारी असली तरी वाहतुकीच्या दृष्टीने काही प्रमाणात धोकादायक ठरू शकते...

नीट निरीक्षण करून, ह्यांच्या सवयींचा चांगला अभ्यास आणि सराव केल्यास ह्यांचा त्रास आपल्याला कमी होतो. आपला आपल्या गाडीवरचा control सुधारावा लागतो.
हे सगळे जमले आणि ह्यांच्या आसपास कुठल्याही बाजूला राहता आले तर मात्र प्रवासाचा आनंद आपणही घेऊ शकता.
त्यामुळे काहीही असले तरी हि जमात रस्त्यावर असल्याने आपला प्रवास सुखकर होतो हे मात्र नाकारता येत नाही!!!