Friday, December 24, 2010

सर्व निष्क्रिय इतिहासकार, तज्ञ, संशोधक आणि आपण सगळे निरुत्साही बामन यांचे हार्दिक अभिनंदन...

सर्व निष्क्रिय इतिहासकार, तज्ञ, संशोधक आणि आपण सगळे निरुत्साही बामन यांचे हार्दिक अभिनंदन...


जातीयवादी लोकांमुळे लालमहालातील दादोजींचा पुतळा हटवण्याचा (हलवण्याचा नव्हे!) निर्णय बहुमताने संमत करण्यात आला (कदाचित "झाला" असेल संमत "केला" नसेल.).

अर्थात बिनग्रेडी लोकांचा उत्साह, तीव्र इच्छा, पराकोटीचा ब्राह्मण-द्वेष (तो इतरांच्यात भीनवण्याची कला) आणि त्यानुसार चाललेले सर्व थरातून प्रयत्न आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सर्व इतिहासकार, संशोधक आणि आपण बामन लोक यांची इतिहासाबद्दलची अनास्था यामुळे त्यांना यश येणारच होते.

माफ करा.. आम्हा बामन लोकांना इतिहासाबद्दल अनास्था नाही तर आम्ही समाजाचा विचार करतो... समाजाला उपयोगी पडणाऱ्या गोष्टी साध्य होणार असतील तरच आम्ही त्या गोष्टींकडे लक्ष देतो...

त्यामुळे आम्हाला असे दादोजी किंवा इतर कुठल्याच वादात पडायचे नाही... पुतळा फुटला तर फुटला, उद्या शनिवार वाडा पाडला तर पाडला, आमचं काय जातंय...

आमचं मत एकच, पुतळा गेला तरी इतिहास बदलत नाही (मग भले तो कोणाला समजला नाही तरी, पुसला गेला तरी, पुढच्या पिढी पर्यंत पोचला नाही तरी!) आम्ही त्यांना अनुल्लेखाने मारू (हे कसे करणार, त्याचा उपयोग काय हे देव जाणे.)

आम्ही सध्या फक्त समाजाचा (म्हणजे खरा तर आमचा, स्वतःचाच फक्त... म्हणायचं समाज वगैरे!!!) विचार करतो. ज्या गोष्टीमुळे आमच्या जीवनावर, दैनंदिन गोष्टींवर फरक पडत नाही त्याचा विचार आम्ही करत नाही.

त्यामुळे राव साहेबांच्या भाषेत सांगायचे तर "इतिहास सुद्धा गेला उंउंउंउंउं"!!!

पुतळा लाल महालातून हलवल्यामुळे कांद्याचे भाव तर कमी होणार नव्हते, पुण्यातले रस्ते, वाहतूक व्यवस्था तर सुधारणार नव्हती... दहशतवाद अजिबात कमी होणार नव्हता... पुण्यातील जागांचे/घरांचे दर तर उतरणार नव्हते ना...

असे खूप प्रश्न सुटणार नव्हते...

अभिनंदन!!! आता मात्र तसं होणार नाही... दादोजींचा पुतळा हटवल्याने सगळ्या नाही तरी खूप गोष्टी सुरळीत होतील...

कांदा स्वस्त होतोय तो त्याच्यामुळेच... (निर्यात कमी केली वगैरे सगळ्या थापा आहेत अरे...)

भ्रष्टाचार वगैरे जाण्यासाठी मात्र एवढे पुरणार नाही...

शनिवार वाडा पडलाच पाहिजे, त्याशिवाय पर्याय नाही...

आणि दहशतवाद वगैरे पासून मुक्तता पाहिजे असेल तर सज्जन गडावरून रामदास स्वामींची हकालपट्टी!!!!

मग सग्गळं नीट, सुरळीत होईल...

असो, लाल-महालातून पुतळा हटवण्यामागची भूमिका मांडताना महत्वाचा मुद्दा असा होता कि दादोजी-शिवाजी हे गुरु-शिष्य नाहीत हे सरकारने मान्य केलेले आहे तरी तो अनऐतिहासिक पुतळा हटवावा, नाहीतर फोडण्यात येईल...

आमच्या इतिहास तज्ञांनी तो पुतळा गुरु-शिष्य नात्याशी संबंधित नसून "सोन्याचा (फाळ लावलेला) नांगर फिरवण्याच्या" घटनेचे प्रतिक आहे, त्यामुळे जरी गुरु-शिष्य मुद्दा विचारात घेतला नाही तरी तो पुतळा आहे तसाच असणे गरजेचे आहे... त्या घटनेच्या वेळी शहाजी राजे पुण्यात नव्हते तर सगळा कारभार शिवाजी महाराज, जिजाबाई यांच्यासह जेष्ठ म्हणून दादोजींच्या हाती सोपवून बेंगळूरला होते... त्यामुळे त्या पुतळ्यात शहाजी महाराज नाहीत आणले तर तो पुतळा अनऐतिहासिक होईल...

हा मुद्दाच मांडला नाही... जर मांडला असेल तर तो विचारात घ्यावा असा मांडला नाही...

आणि आम्ही बामन लोक काही न करता, आपापली कामे करत राहिलो... बिनग्रेडी लोकांचे आंदोलन वगैरे काही गोष्टींमुळे रस्त्यावर गाड्यांना, लोकांना होणारा त्रास सोसत मनातल्या मनात ४ शिव्या घातल्या एवढंच....

मी फक्त ब्राह्मण लोकांबद्दल बोलतोय कारण, मला आमच्या लोकांची मतं माहित आहेत... ब्राह्मणेतर लोकांची मते फारशी माहित नाहीत. खूप लोक दादोजीच्या बाजूने आहेत हे खरं आहे.

साहित्य संमेलनाच्या आधी त्याला विरोध करताना शिवाजी जनार्दन शिवाजी चव्हाण यांचे वक्तव्य:

"ज्या दादू कोंडदेवचा शिवरायांच्या बालपणाशी सुतराम संबंध नाही, ज्याला स्वराज्य काय हे माहिती नाही ज्याचा उजवा हात छाटण्यात आलेला आहे. ज्याच्या बद्दल अनेक संशय व्यक्त केले जातात. ज्या माणसाने विश्वासघाताने अनेक मराठा मराठा बहुजन सरदारांना मारले. अशा माणसाचे नाव आम्ही कदापि खपवून घेणार नाही. काही इतिहास करांनी त्यांना शिवाजी महाराजांचे शिक्षक, गुरु, पालक, मालक, मार्गदर्शक पदी नेमले खोटा इतिहास आमच्या माथ्यावर मारला तेव्हा अशा माणसाचे नाव आम्ही स्टेडीयमाला राहू देणार नाही ते बदलूनच श्वास घेणार!"

असे म्हणताना, दादोजींचा संबंध तोडून टाकला शिवाजींच्या बालपणाशी आणि स्वराज्याशीही...

असो, लवकरच दादोजींची इतिहासातून हकालपट्टी होईल, त्यानंतर गागाभट्ट, समर्थ रामदास स्वामी, पेशवे याचा नंबर आहे...

असे खूप जण नंबरात उभे आहेत...

सर्व निष्क्रिय इतिहासकार, तज्ञ, संशोधक आणि आपण सगळे निरुत्साही बामन यांच्या कृपेने त्यांच्या कार्य सिद्धीस जाईलच हा विश्वास आहे... तरी त्यांना शुभेच्छा देतो!!!

Thursday, July 8, 2010

संत रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज... - II

समर्थ आणि शिवराय या दोन प्रभूतींच्या भेटीआधीचा प्रसंग...


हात जोडून अत्यंत नम्रपणे शिवाजी राजेंनी तुकाराम महाराजांना विचारले, “महाराज!, रामदास गोसावी काय करतात? त्यांचा पोशाख कसा असतो? ते आपल्यासारखेच गृहस्थ आहेत का?”

तेंव्हा तुकाराम महाराजांनी वर्णन करणारा एक अभंगच शिवाजी महाराजांना लिहून दिला.


हुर्मुजी रंगाचा उंच मोतीदाणा ।
रामदासी बाणा या रंगाचा ॥१॥
पीतवर्ण कांई तेज अघटित ।
अवाळू शोभत भ्रृकुटी माजी ॥२॥
रामनामुद्रा द्वादश हे टिळे ।
पुच्छ ते वळवळे कटीमाजी ॥३॥
कौपिन परिधान मेखला खांद्यावरी ।
तुंबा कुबडी करी समर्थांच्या ॥४॥
काष्टाच्या खडावा स्वामींच्या पायांत ।
स्मरणी हातात तुळशीची ॥५॥
कृष्णेच्या तटाकी जाहले दर्शन ।
वंदिले चरण तुका म्हणे ॥६॥


रामदास स्वामीनी शिवाजी राजेंना आपले दोन शिष्य ‘दिवाकर’ आणि ‘कल्याण’ ह्यांच्या हस्ते पत्र पाठवले होते, त्यात ते म्हणतात -


निश्चयाचा महामेरू । बहुत जनासी आधारू ॥
अखंड स्थितीचा निर्धारू । श्रीमंत योगी॥
परोपकाराचिया राशी । अखंड घडती जयासी ।
तयाचे गुणमहत्वासी । तुळणा कैची ॥
नरपती हयपती । गजपती गडपती ।
पुरंदर आणि शक्ती । पृष्ठभागी ॥
यशवंत कीर्तीवंत । सामर्थ्यवंत वरदवंत ।
नीतिवंत आणि जयवंत । जाणता राजा ॥
आचारशील विचारशील । दानशील धर्मशील।
सर्वज्ञपणे सुशील । सकळा ठायी ॥
धीर उदार गंभीर । शूर क्रियेसी तत्पर ।
सावधपणे नृपवर । तुच्छ केले ॥
या भूमंडळाचे ठायी । धर्म रक्षी ऐसा नाही ॥
महराष्ट्र धर्म राहिला काही । तुम्हा करिता ॥
कित्येक दुष्ट संहारिले । कित्येकास धाक सुटले ।
कित्येकास आश्रय जाले । शिवकल्याण राजा ॥
तुमचे देशी वास्तव्य केले । परंतु वर्तमान नाही घेतले ।
ऋणानुबंधे विस्मरण जाले । काय नेणू ॥
सर्वज्ञ तुम्ही धर्ममूर्ती । सांगणे काय तुम्हाप्रती ।
धर्मस्थापनेची कीर्ती । सांभाळली पाहिजे ॥
उदंड राजकारण तटले । तेणे चित्त विभागले ।
संग नसता लिहीले । क्षमा केली पाहिजे ॥

शिवाजी महाराज, समर्थ रामदास स्वामींबरोबरच्या ह्या भेटींनंतर समर्थांना म्हणाले, “स्वामीमहाराज, या सैनिकांना आपण कृपा करुन उपदेशपर काही सांगावे” तेंव्हा समर्थ म्हणतात -


जयास वाटे मरणाचे भये । त्याने क्षात्रधर्म करू नये ।
काहीतरी करोन उपाये । पोट भरावे ॥
मारिता मारिता मरावे । तेणे गतीस पावावे ।
फिरोन येता भोगावे । महद़भाग्य ॥
विन्मुख मरणे नर्के जाती । वाचोन येता मोठी फजिती ।
इहलोक परलोक जाती । पाहा ना का ॥
मरण हाक तो चुकेना । देह वाचिता वाचेना ।
विवेकी होऊन समजाना । काये करावे ।
देव मात्र उच्छेदिला । आपला स्वधर्म बुडाला ।
जित्या परीस मृत्यु भला । ऐसे समजावे ॥
धर्माकरिता मरावे । मरोनी अवघ्यासी मारावे ।
मारता मारता घ्यावे । राज्य आपुले ॥
देवद्रोही तितुके कुत्ते । मारोनि घालावे परत ।
देवदास पावती फत्ते । यदर्थी संशयो नाही ॥
देव मस्तकी धरावा । अवघा हलकल्ल्लोळ करावा ।
मुलुख बडवा की बुडवावा । धर्म स्थापनेसाठी ॥


संदर्भ – शिवाजी आणि रामदास, प्रसाद प्रकाशन

Friday, May 28, 2010

संत रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज... - I

Iसध्या शिवाजी महाराजांच्या विषयी लिहिलेला इतिहास समाजातील काही गटांना अप्रिय आहे.

त्यातूनच मग

समर्थ रामदास स्वामी यांनी शिवाजी महाराजांना काही उपदेश केलाच नव्हता, त्यांची कधीही भेट झाली नव्हती, दादोजी कोंडदेव हे महाराजांचे गुरु नव्हतेच, यांसारख्या कल्पना त्यांच्या सुपीक डोक्यातून बाहेर पडू लागल्या...


आपण संत रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संबधी काही लिखाण पाहू...

रामदास स्वामी यांनी वेळोवेळी शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेसाठी मदत केली आहे...

१६४९ साली छत्रपती आणि समर्थांची भेट झाली, त्यावेळी महाराजांनी समर्थांना, काही उपदेश करावा अशी विनंती केली.
शिवछत्रपतींनी पहिल्या भेटीतच समर्थांकडून अनुग्रह घेतला.
ह्यावेळी समर्थांनी शिवाजी महाराजांना राजधर्म नावाचे मौलिक प्रकरण सांगितले...

आधी मनुष्य ओळखावे । योग्य पाहुनी काम सांगावे ।
निकामी तरी ठेवावे । येकीकडे ।।१।।
पाहोनी समजोनी कार्य करणे । तेणे कदापी न येणे उणे ।
कार्यकर्त्यांच्या गुणे । कार्यभाग होतो ।।२।।
कार्यकर्ता प्रयात्नी जाड । काहीएक असला हेकांड ।
तरी समर्थपणे पोट वाड । केले पाहिजे ।।३।।
अमर्याद फितवेखोर । यांचा करावा संहार ।
शोधिला पाहिजे विचार । यथातथ्य ।।४।।
मनुष्ये राजी राखणे । हीच भाग्याची लक्षणे ।
कठिणपणे दूरी धरणे । काही येक ।।५।।
समयी मनुष्य कामा येते । याकारणे सोशिजेते ।
न्यायची नसता मग ते । सहजची खोटे ।।६।।
न्यायासिमा उल्लंघू नये । उल्लंघिता होतो अपाय ।
न्याय नसता उपाय । होईल कैचा ।।७।।
उपाधीस कंटाळला । तो भाग्यावाचून चेवला ।
समयी धीर सांडिला । तोही खोटा ।।८।।
संकटी कंटाळो नये । करावे अत्यंत उपाये ।
तरी मग पाहता काय । उणे आहे ।।९।।
बंद बांधावे नेटके । जेणेकरिता चतुर तुके ।
ताबे न होता फिके । समुदाय होती ।।१०।।
धुरेने युद्धासी जाणे । ऐसी नव्हे ती राजकारणे ।
धुराच करून सोडणे । कितेक लोक ।।११।।
उदंड मुंडे असावी । सर्वही एक न करावी ।
वेगळाली कामे घ्यावी । सावधपणे ।।१२।।
मोहरा पेटला अभिमाना । मग तो जीवाचे पाहेना ।
मोहरे मेळवून नाना । वरी चेपटे करी ।।१३।।
देखोन व्याघ्राचा चपेटा । मेंढरे पळती बारा वाटा ।
मस्त जाला रेडा मोठा । तो काय करावा ।।१४।।
रायांनी करावे राजकर्म । क्षत्री करावे क्षात्रधर्म ।
ब्राह्मणी करावे स्वधर्म । नाना प्रकारे ।।१५।।
तुरंग शास्त्र आणि स्वार । पहिलाच पहावा विचार ।
निवडुनी जाता थोर थोर । शत्रू पळती ।।१६।।
ऐशा प्रपंचाचा विवेक । स्वल्प बोलिलो काही येक ।
येका मनोगते स्वामी सेवक । असता बरे ।।१७।।

संत तुकाराम महाराज यांनी १६५० सालच्या जानेवारी महिन्यात देह ठेवला. त्यापूर्वी त्यांनी महाराजांना पत्र लिहिले होते. त्यात ते म्हणतात.

रामदास स्वामी । सोयरा सज्जन । त्यासी तनमन । अर्पि बापा ।।
मारुती अवतार । स्वामी प्रकटला । उपदेश केला । तुजलागी ।।

या अभंगात समर्थांनी शिवाजी महाराजांना उपदेश दिल्याचा उल्लेख संत तुकाराम महाराज करतात. त्यामुळे इ.स. १६४९ च्या भेटीमधेच शिवरायांनी अनुग्रह घेतला हे स्पष्ट होते.

शिवाजी महाराजांनी संत तुकाराम यांचा आशीर्वाद मागितला असता ते महाराज शिवाजी महाराजांना म्हणतात -


तुझी भेट घेणे काय हो मागणे । आशेचे ही शून्य केले तेणे ।।१।।
निराशेचा गाव दिधला आम्हासी । प्रकृती-भावाशी सोडीयेले ।।२।।
पतिव्रता मन पतीशीच भेटो । तैसे आम्ही विठोमाजी नांदो ।।३।।
विश्व हे विठ्ठल दुजे नाही काही । दुखणे तुझेही तुजमाजी ।।४।।
बहुतांची वृत्ती चाळावली जेंव्हा । रामदास्य तेव्हा घडे केवी ।।५।।
सद्गुरू श्रीराम-दासाचे भाषण । तेथे घाली मन चालू नको ।।६।।
तुका म्हणे बापा चातुर्य सागरा । भक्ती एक थारा भाविकासी ।।७।।

या श्लोकामध्ये तुकाराम महाराजांनी शिवाजी महाराजांना समर्थांची कास धरावी असे सांगितले आहे...


विवेके करावे कार्यसाधन ।
जाणार नरतनू हे जाणोन ।
पूढिल भविष्यार्थी मन ।
हाटोची नये ।।१।।

चालू नये असन्मार्गी ।
त्यता बाणल्या अंगी ।
घुवीर कृपा ते प्रसंगी ।
दास महात्म्य वाढवी ।।२।।

जनीनाथ आणि दिनकर ।
नित्य करिती संचार ।
घालिताती येरझार ।
लाविले भ्रमण जगदिशे ।।३।।

दिमाया मूळ भवानी ।
हे सकल ब्रम्हांडांची स्वामिनी ।
येकान्ती विवेक करोनी ।
इष्ट योजना करावी ।।४।।

या श्लोकातील Bold केलेले अक्षर घेतले तर 'विजापूरचा सरदार निघाला आहे' असे वाक्य तयार होते, ही बातमी दिल्यावर "येकान्ती विवेक करोनी । इष्ट योजना करावी ।।" असेही समर्थ लिहितात.

"विजापूरचा सरदार निघाला आहे" हे संकेतिक भाषेत समर्थांनी शिवरायांना सांगितले यावरून ते स्वराज्यासाठी, पर्यायाने शिवरायांसाठी राजकीय हालचाली ही करत होते हे स्पष्ट होते.

त्यावेळचे वातावरण अत्यंत प्रतिकूल होते. त्यामुळे समर्थ काळजी पूर्वक हालचाली करत होते. त्यामुळे समर्थ आणि शिवराय यांच्या भेटीचे पुरावे कमीत कमी असावेत याकडे त्यांनी लक्ष दिले होते.

जाते स्थळ ते सांगेना । सांगितले तरी तेथे जाईना ।
आपुली स्तिथी अनुमाना । येवो ची नेदी ।।
लोकी केले ते चुकवी । लोकी भावले ते उलथवी ।
लोकी तर्किले ते दावी । निर्फळ करुनी ।।
एवं कल्पिता काल्पेना । तर्कीताही तर्केना ।
कदापी भविता भावेना । योगेश्वर ।।

म्हणजे कोठेही जाताना सांगून जावू नये, अथवा सांगितल्यास त्या ठिकाणी जाऊ नये. आपल्याबद्दलची खरी माहिती गुप्त ठेवावी. कोणी काही निष्कर्ष काढल्यास तो निष्फळ ठरवावा...

राजकीय हालचाली अश्याच कराव्या लागतात, अथवा त्या असफल होऊ शकतात.

याचा अर्थ असा की आपल्या कार्याचा दुसऱ्याला अंदाज येऊ नये व आपल्याबद्दल कुणी विशिष्ठ मत तयार करून घेऊ नये याची काळजी स्वतः समर्थ घेतात.

शिवाजी महाराज तर आपल्या मावळ्यांना सुचना देतात की "प्रत्येक दगडाखाली विंचू आहे असे समजून दगड उचलावा" अशा बिकट परिस्तिथीत समर्थ आणि शिवराय यांनी आपल्या भेटीचे कागदपत्र ठेवले असतील असे वाटत नाही.

शिवाजी महाराजांना आग्र्याहून राजगडावर येताना समर्थांच्या मठाचे जे सहकार्य झाले त्याची कागदोपत्री नोंद ठेवली असती तर औरंगजेबाने सगळे मठ जाळून टाकले असते.

एकंदरीत देशस्तिथी पाहिल्यानंतर समर्थ स्वराज्य संस्थापनेसाठी इतके व्याकुळ झाले आहेत की शहाजी राजांच्या जहागिरीत येऊनही तीन वर्षात शिवाजी राजे भेटले नाहीत म्हणून ते अधीर झालेत. तुळजाभवानीला शिवाजी महाराजांसाठी समर्थ इ.स. १६५७ साली प्रार्थना करतात,


'तुझा तू वाढवी राजा । सिघ्र आम्हाचि देखता'

केव्हा एकदा शिवाजी महाराजांना सिंहासनावर बसलेले पाहतोय असे त्यांना इ.स. १६५७ सालीच झाले होते.

यावरून त्यांचे स्वराज्यावरील आणि शिवरायांवरील प्रेमही दिसून येते.

तात्पर्य, शिव-समर्थ भेट इ.स. १६५० साली झाली इ.स. १६८० पर्यंत त्यांनी एकत्र कार्य केले.
शिवाजी महाराजांना समर्थांची जशी मदत झाली त्याच प्रमाणे शिवाजी महाराजांचा राजाश्रय मिळाल्यामुळे समर्थांच्या मठांचा विस्तार झाला आणि ते स्थिर होण्यास मदत झाली.



सौजन्य: "चिंता करितो विश्वाची" लेखक: सुनील चिंचोळकर