Saturday, February 26, 2011

स्वातंत्र्यवीर!!! - II

वय ३० वर्षे: शिक्षा, ५० वर्ष जन्मठेपेची काळ्या पाण्याची... कालावधी १९११ ते १९६०, म्हणजे सुटकेचे वय ८० वर्षे फक्त!
आणि हा माणूस कोर्टात म्हणतो: Are you sure that British will rule India upto 1960?
कसं काय माणूस म्हणायचं ह्याला...

तिकडे फ्रांस सरकार हैराण, इंग्रजांनी आपल्या किना-यावरून माणूस पकडून नेला ते प्रकरण निस्तरताना...
सगळ्यांनी "असं कसं झालं? आपल्या जमिनीवरून इंग्रजांनी माणूस नेलाच कसा?" असं विचारून बेजार केलेलं...
फ्रांस सरकारने ते प्रकरण आंतरराष्ट्रीय कोर्टात नेलं. तिथल्या निर्णयानुसार सगळ्यांसमोर, इंग्लंडच्या पंतप्रधानांनी, जाहीररीत्या, उभं राहून माफी मागितली.
बरं माफी ठीक आहे, पण प्रकरण पूर्ण मिटवण्यासाठी फ्रांस ने विचार केला, कदाचित हा माणूस, काळ्या पाण्याची शिक्षा झालेला, परत समुद्रात उडी मारेल आणि आपण त्याला वाचवू. म्हणून स्वखर्चाने, आपल्या Defense Ministry मधली एक पाणबुडी, भारतापासून पार अंदमान पर्यंत या कैद्यांच्या बोटीमागून नेली.
पण तसं काही झालं नाही. कैदी अंदमानला पोचले. शिक्षा सुरु झाली.
नारळाच्या काथ्या कुटायच्या, दोर वळायचा. नंतर ८ तास लोखंडाचा "कोलू" फिरवायचा.
हा माणूस, हे सगळं झाल्यावर, संध्याकाळी कैद्यांचे साक्षरता वर्ग घ्यायचा.
नंतर तुरुंगात परत गेल्यावर भिंतींवर कविता लिहून काढायच्या. "मर्मबंधातली ठेव हि" हे नाट्यगीत तुरुंगात सुचले त्यांना. तुरुंगातल्या आठवणी म्हणजे ह्यांच्यासाठी मर्मबंधातली ठेव! काय पण माणूस...
कैद्यांना घरातून मिठाई ऐवजी पुस्तके आणायला सांगितली आणि Library सुरु केली, तुरुंगात.
मुसलमान कैदी हिंदूंना बाटवायचे, तो प्रकार त्यांनी बंद केला. (म्हणून पुढे अंदमानहि पुढे पाकिस्तान व्ह्यायचा वाचला, कदाचित!)
या सगळ्या प्रकारांनी जेलर जाम वैतागला. कोणीही नियमाविरुद्ध वागत नाही म्हणून कारवाईही करता येत नव्हती. मग त्याने एक माणूस बोलावला, डांबर घेऊन. तुरुंगातल्या कविता लिहिलेल्या भिंती डांबराने रंगवून टाकल्या.
आता हा माणूस कविता पुसल्या म्हणून आपल्यावर हात उगारेल आणि मग आपण त्याला ठोकून काढू अश्या आनंदात जेलर होता. तर आमचे कवी, "Thank You" म्हणत Shake-hand करायला पुढे!
"अहो, त्या भिंतीवर लिहिलेल्या कविता पाठ झाल्या होत्या, दुस-या लिहायला जागा शिल्लक नव्हती. तुम्ही भिंती रंगवून भरपूर जागा केली."

असो... तर तिकडे मनासारखं काम झाल्यावर सरकारला पत्र लिहिलं "मी काही राजकारणात पडणार नाही. मला माफ करा. पण इथून सुटका करा."
सरकारने ह्यावर विश्वास ठेवला. कैद्याला भारतात परत आणला, पण स्थानबद्धतेत ठेवलं, रत्नागिरीत!
रत्नागिरीत जातीभेद निर्मुलनासारखी राजकारणाशी (Directly) संबंधित नसलेली, समाजोपयोगी कामं, विरोध पत्करून करून स्थानबद्धतेतून सुटका झाल्यावर सक्रीय राजकारणात पडून सरकारचा विश्वासघात केला.
(जातीभेद कमी करण्यासाठी पतितपावन मंदिर उभारलं, तिथली पहिली पूजा, भंग्याच्या हातून करवली, गाभा-यात जाऊन!)
सरळ-सरळ विश्वासघात.. पर्याय नव्हता, Plan पूर्वीच ठरला होता... माफीपत्र काय उगीच दिलं नव्हतं...

हा माणूस हे सगळं करत असताना त्यांचे कुटुंबीय काय करत होते? लपून होते? शोक करत होते? अजिब्बात नाही...
इंग्लंड मधून स्वयंपाकाच्या सामानाच्या नावाखाली निघालेले बाँब नाशकात आले आणि अचानक, हो अचानकच, त्यांची वाहिनी आणि बायको यांना दिवस गेले, खोटं नाही, नाशिक पोलिसांचा Report आहे तसा.
हं, मग ह्या दोघी delivery साठी सुरत, गुजरात ला निघाल्या... आगगाडीने. गुजरात मध्ये बंगालच्या कोणीतरी दोघी आल्या होत्या. ह्या दोघींनी, त्या दोघींना, आपले दिवस deliver केले आणि नाशकात परत आल्या. नाशिक पोलिसांचा report आहे, बाँब कसे transfer झाले यावरच्या सफाईचा. त्यांनी स्पष्ट म्हटले आहे, "देवकीची मुलं यशोदेकडे जातात". बरं, गरोदर बाईची झडती घ्यायची परवानगी नाही, पोलीस काय करणार...
वाचताना गम्मत वाटेल पण त्या दोघींनी आपापल्या पोटावर, साडीच्या आतून, बाँब बांधून नेले होते, आगगाडीतून, चेष्टा नव्हे!!! आपण फक्त कल्पना करायची...
हे अख्ख कुटुंबच वेगळं होतं.
ह्या कुटुंबाला सरकारने काय दिलं? मोठ्या भावाला २५ वर्षाची काळ्या पाण्याची शिक्षा दिली, लहान भावाला अटक केली, ह्यांना अटकेचे वॉरंट (ते कान्हेरेनी पिस्तुल वापरलं, हां, ते.). सगळं घर, जमीन, शेती, भांडी सुद्धा जप्त केली. सगळी bank accounts seal केली आणि वर वाहिनी आणि बायको ह्यांना कुणीही घरात घ्यायचे नाही, घेतल्यास घरावरून गाढवाचा नांगर फिरवू, घर पाडू अशी ऑर्डर...
५-६ वर्ष ह्या दोघी, माहेरी, गुरांच्या गोठ्यात राहत होत्या.
हे सरकार भारताविरुद्धच होतं, पण गम्मत ऐकून ठेवा...
आपल्या सरकारने, भारत सरकारने, आजतागायत ती property त्यांच्या वंशजांच्या ताब्यात दिलेली नाही...

त्यांचं नशीबच वेगळं होतं. इंग्रज सरकारने त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा देऊन तुरुंगात टाकलं आणि स्वातंत्र्य मिळाल्यावर सुद्धा, भारत सरकारने, कोंग्रेस सरकारने, गांधी-वधाच्या आरोपाखाली तुरुंगात टाकलं...
(रत्नागिरीत तुरुंगात ठेवले असताना त्यांना ज्या हातकड्या घातल्या होत्या त्या अक्षरशः आपण उचलूही शकत नाही... त्याचे छायाचित्र घेऊ न दिल्याने मी ते दाखवू शकत नाही...)
पुराव्या अभावी निर्दोष सुटले ते, सुटणारच होते. नथुरामला ह्यांनी कटात मदत करण्याची काय गरज होती? तो नथुरामच्या बुद्धीचा अपमान आहे. असो, तो विषय वेगळा आहे, आपण विषय बदलायचा नाही!
तर, स्वातंत्र्यानंतरही, स्वातंत्र्यासाठी लढणा-या, आयुष्य वेचणा-या या मनुष्याला तुरुंगवास भोगावा लागला...
देशाचे दुर्दैव, दुसरे काय?

अखंड भारत अंगण व्हावे !
राष्ट्र ध्व्जासह निशाण भगवे!
हिंदुत्वा तू अमर करावे !
हेच मागणे आता....
विनायका घे पुनर्जन्म आता !!!!
कुशाग्र बुद्धिमत्ता, इतिहास, राजकारणाचा गाढा अभ्यास-व्यासंग, द्रष्ठेपणा, मुत्साद्दिपणा, तेजस्विता, अचाट असा बौद्दिक व शारीरिक पराक्रम, अजोड असे प्रभावी वक्तृत्व, अभ्यासू संभाषण कुशलता, व्यासंगी लेखकत्व, असीम त्याग, अतुलनीय धैर्य, निष्काम स्थितप्रज्ञता, तत्वचिंतक कर्मयोगी, महाकवी, आत्मविश्वासुवृत्ती यांचा सुरेख संगम म्हणजे तात्याराव विनायक दामोदर सावरकर यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन. ......

स्वातंत्र्यवीर!!! - I

इंग्लंडच्या पंतप्रधानांनी ज्या माणसासाठी, International Court मध्ये सगळ्यांसमोर उभं राहून माफी मागितली त्या माणसाचा जन्म आपल्या महाराष्ट्रातील नाशिक जवळच्या एका "भगूर" नावाच्या खेड्यातला.

वय १०: स्वदेशीचा फटका (आर्य बंधुनो उठा उठा कां मठासारखे नटा सदा||) व सवाईमाधवरावाचा रंग (धन्य कुलामिध धनी सवाई भाग्य धन्यची रायाचे ।।) या कवितेची रचना...

वय १४: अष्टभुजा देवीसमोर प्रतिज्ञा...
आई, या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी, सशस्त्र क्रांतीचा केतू उभा करून शत्रूला मारता मारता मरेतो झुंजेन.
(यातलं "सशस्त्र क्रांती" आणि "मारता मारता मरेतो झुंजेन" हे फार महत्वाचे आहे...  क्रांती नुसती भाषणे देऊन नाही, सरकारला विनंत्या करून नाही, तर स-शस्त्र  आहे...
"देशासाठी मरेन" हे पण बरोबर, पण नुसतं मरेन का? नाही! "मारता मारता मरेतो झुंजेन"!!!)

वय १६: "स्वतंत्र्यते भगवती" कवितेची रचना...

FC कॉलेज मध्ये असताना छत्रपती शिवाजी महाराजांवर आरतीची रचना... "जय देव, जय देव, जय जय शिवराया..."

वय २१: सार्वजनिक सभेत व्याख्यान (सावरकरांचे बहुतेक पुण्यातील एकमेव व्याख्यान) त्यावर त्यावेळचे पोलीस reporter म्हणतात "‘’It was so dexterous ! So triumphant ! He is at The most 22, but he is already an accomplished orator of an enviable rank."

नंतर भारत, इंग्लंड, अंदमान, तुरुंगात कवितांची रचना...

नाट्यगीतं, नाटकं यांची रचना...

मराठी भाषेला अनेक इंग्रजी भाषेतील शब्दांना पर्यायी शब्दांची देणगी...
(Mayer: महापौर, Film/Picture: चित्रपट, Director/Direction: दिग्दर्शक/दिग्दर्शन ई.)

पुण्यात विदेशी कपड्यांची होळी...

किती यादी मांडणार...

लोकमान्य टिळकांच्या सांगण्यावरून हा मनुष्य इंग्लंडला बॅरीष्टर पदवी प्राप्त करायला गेला. लो. टिळकांनी नुसते सांगितले नाही, तर त्यासाठी जे २ साक्षीदार लागतात त्यातील एक म्हणून सही सुद्धा केली. दुसरे साक्षीदार बनले "कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर"!
हे पोरगं इंग्लंडला गेल्यावर काय उपद्व्याप करणारे ते माहित असताना सुद्धा लो. टिळक जमीन राहिले. हा मोठेपणा!

वय २३: घरी बायको, ६ महिन्याचा मुलगा, तरीही हे चालले इंग्लंडला... "अरे, गुरु गोंविंदसिंगांनी नाही का त्याग केला, तसा आपल्यालाही करायला हवा" अशी हरनान सिंग नावाच्या मित्राची समजूत काढत...
काऽऽय माणूस असेल.. सोपं नाहीये हे.

बरं तिकडे जाऊन लगेच उपद्व्याप सुरु...
"India House" चालणार नाही... "भारत भवन"! ("पांडुरंग" चे "पांडूकलर" करतो का आपण?)
अभ्यास करत असतानाच तिथेच प्रयोगशाळा उभारली. सेनापती बापट बरोबरच होते.
एका रशियन माणसाच्या मदतीने बाँब तयार केले. एकाची Trial घेतली, जवळच्या जंगलात. लगेच त्याचे तुकडे जमा करून विल्हेवाट लावली.
दुसरे बाँब भारतात पाठवले, चतुर्भुज नावाच्या कूक बरोबर, स्वयंपाकाचे सामान म्हणून...
ते बाँब नाशिक मध्ये आले आणि गुजरात मधून बंगाल पर्यंत पोचले.
१९०८ साली खुदीराम बोस यांनी त्यातल्याच बाँबचा स्फोट केला.
इंग्लंड मध्ये एक पंजाबी हि-याचे व्यापारी, सरदारसिंग राणा यांच्या पैशाच्या मदतीने पिस्तुले खरेदी करून ती पुस्तकांत लपवून भारतात पाठवून दिली, या कानाचा त्या कानाला पत्ता, न लागता!
अनंत कान्हेरे यांनी त्यातील पिस्तुल वापरल्यावर सरकारला त्याचा पत्ता लागला आणि पिस्तुल पाठवणा-यावर अटक वॉरंट काढलं...

तिकडे इंग्लंडमध्ये समुद्र किना-यावर बसलेले असताना एक काव्य स्फुरलं. आपलं भाग्य चांगलं कि त्यांच्या मित्राने काव्याचे ते शब्द सगळे कागदावर उतरवून घेतले. काव्याचे शब्द होते... "ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला..."
ती कविता, मातृभूमीचे विरहगीत येथे अर्थासहित वाचू शकता.
http://www.savarkar.org/mr/साहित्य/‘ने-मजसी-ने’-–-एक-भावदर्शन
(शेवटची एक ओळ राहिल्ये तिथे, "जो आचमनी, एक क्षणी, तुज प्याला")

अटक वॉरंट निघाल्यावर त्यांना भारतात खटला चालवायला आणायचं ठरलं.

भारतातच का? तर भारतात कोर्टातली जबानी दाबायला सोपी जाते. जशी नथुरामच्या जबानीवर ३० वर्षांची बंदी घातली होती, जाहीर करायला...
इंग्लंड मध्ये तशी दाबा-दाबी करता येणं काठीण होतं.
विषय बदलायचा नाही... असो,

हिंदुस्तानातील कोर्टासमोर जाणे म्हणजे फाशी वा अंदमानला जाणे होय हे निश्चित होते. म्हणून आपले त्यांनी आपल्या वहिनीस आपले मृत्युपत्र लिहून धाडले. (हे मृत्युपात्रही २५ कडव्यांचे आहे.)
भारतात आणलं जात असताना मार्सेलिस या फ्रांसच्या बंदराजवळ आल्यावर त्यांनी रक्ताळलेल्या अंगाने, बोटीवरच्या संडासातून, जिथे भयानक मासे असतात,अश्या खा-या पाण्यात उडी मारली. फर्लांगभर अंतर पोहून किना-यावर पोचले पण इंग्रजांनी त्यांना परत पकडले.
Plan ठरलेला होता, यांनी उडी मारायची आणि किना-यावर मादाम कामा, ज्या फ्रांसच्या पार्लमेंट मध्ये सदस्य होत्या, यांनी त्यांना घेऊन जायचे. पण काही मिनिटांचा उशीर झाला आणि plan फसला. तो उशीर कदाचित भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठीही उशीर ठरला, असे असू शकते.
पण दुर्दैवाने plan फसला आणि भारतात आल्यावर कोर्टाने ५० वर्ष जन्मठेपेची काळ्या पाण्याची शिक्षा सुनावली.
आजपर्यंतच्या जगाच्या, फक्त भारताच्या नव्हे, इतिहासात कोणालाही इतकी मोठी जन्मठेपेची/सक्तमजुरीची शिक्षा जाहीर सुद्धा झालेली नव्हती.

Thursday, February 10, 2011

बिनग्रेड - २

बिनग्रेड - २ == बिनग्रेड - हरी नरके - एम. डी. रामटेके.
(थोडक्यात, बिनग्रेड समर्थक नरके, रामटेके आता विरोधक!)

४ फेब्रुवारी २०११ च्या लोकप्रभा मध्ये एक लेख आला... प्रा. हरी नरके यांचा, "दादोजी कोंडदेव आणि ब्रिगेडचे राजकारण".
तो लेख खूप जणांनी वाचला, काही जणांनी "हरी नरके" हे नांव वाचून, काहींनी "दादोजी" नांव बघून तर काहींनी "ब्रिगेड" नांव बघून...

नरके यांनी त्यांच्या लेखात "ब्राह्मण आणि क्षत्रिय" यांना लक्ष्य करून त्यांच्या "युती" मध्ये कायम "दलित-ओबीसींचा" बळी गेला असे मांडले आहे.
वास्तविक नरके हे बिनग्रेड आणि बामसेफ यांच्या मंचावरचे वक्ते. पण त्यांनीही "जेम्स लेन" चे दळण बिनग्रेडी लोकांनी कसे दळत ठेवले, आपली गिरण बंद न पडू देण्यासाठी, ते स्पष्ट शब्दात सांगितले आहे.
या प्रकरणाला जातीय रंग देण्यासाठीच बिनग्रेडी लोकांनी हे केले असून ते कसे हास्यास्पद आहेत हे हि सांगितले आहे...

असो, तर प्रा. नरकेंनी हे असे सगळे बाहेर का काढले असावे हे ही बघू.
(खालील सर्व मुद्दे हे त्यांच्या लेखातील आहेत.)
१.बिनग्रेडी लोकांनी लेनने उल्लेख केलेल्या १५ भारतीयांना लेनचे हस्तक ठरवले आहे. त्यातील बहुतेक जणांनी "बहुजन-दलित चळवळीला उपकारक" असे काहीतरी योगदान दिले आहे.
त्यामुळे त्यांनाही लेनचे हस्तक ठरविणे ही कृतघ्नता आहे.
२.बिनग्रेडी लोकांनी हे सगळे "फुले आंबेडकरी चळवळीवर अवैध कब्जा मिळवण्यासाठी चालू केले आहे.
"ब्रिगेडचा ब्राह्मणद्वेष हा केवळ बुरखा असून फुले आंबेडकरी चळवळीवर अवैध कब्जा मिळवण्यासाठीची ती रणनीती आहे."
अवांतर: म्हणजे फुले-आंबेडकर चळवळीसाठी "ब्राह्मण द्वेष" लागतो, आणि बिनग्रेडी लोकांनी तो "बुरखा" म्हणून "कब्जा" मिळवण्यासाठी घेतलाय असा अर्थ निघू शकतो का?
३. भांडारकरशी संबंध आहे म्हणून बिनग्रेडी लोकांनी नरकेंना राजीनामा द्यायला सांगितले.
४. श्री. पुरके आणि शालिनीताई पाटील यांना ‘"मराठा" विश्वभूषण’ पुरस्कार दिला.
५. बिनग्रेडी लोकांनी दादोजींना "ब्राह्मणांचा आयकॉन" बनवले.
६. सरसकट सर्व ब्राह्मणांना झोडपण्यामागे त्यातील फुले आंबेडकरवादी, परिवर्तनवादी शक्तींचे मित्र असलेल्यांना बहुजनांचे शत्रू म्हणून बदनाम करणे आणि संघ परिवाराच्या काळया बाजूकडून लोकांचे लक्ष या प्रागतिक शक्तींविरुद्ध केंद्रीत करायला लावणे हा डावपेच यामागे आहे.
७. मराठा तितुका मेळवावा! गुणदोषांसहित स्वीकारावा!
दलित भटका ओबीसी! अमराठा अवघा ठेचावा!
सोयरिकी उच्च! आरक्षणी मागास सांगावा!
ब्राह्मणद्वेष दाखवावा! मराठादेश घडवावा!
ब्रिगेडचा हा अंतस्थ कावा.
८. रमाबाई नगर गोळीबार प्रकरणातील आरोपी मनोहर कदम हा स्वजातीय असल्याने शासनाला त्याच्यावर कारवाई करू दिली जात नाही.
९. ओबीसी नेत्यांना मराठाद्वेष्टे ठरवून राजकीय आयुष्यातून उठविण्याचा ब्रिगेडचा कावा असतो.
१०. अमराठाद्वेष हे सूत्र घेऊन, ‘‘जिभ छाटू, हात तोडू, राजकारणातून उखडून टाकू, वाजवा टाळी हाकला माळी, वाजवा तुतारी हाकला वंजारी, अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट रद्द करा’’ अशी मांडणी उघडपणे केली गेली.
११. डॉ. आंबेडकरांच्या रिडल्सवर बंदी घालण्याची मागणी करणारे ब्रिगेडचेच बंधू आहेत.

असो, तर हा लेख एम.डी. रामटेके यांनीही वाचला...
त्यांनी "संभाजी ब्रिगेड एक सम्यक संघट्ना" असा एक लेख आधीच लिहिला आहे.
त्यात बिनग्रेडी लोकांचे भरपूर कौतुक करून "मिडियानी संभाजी ब्रिगेडला बदनाम केले" असेही ते लिहितात.(http://mdramteke.blogspot.com/2010/09/blog-post_14.html)
पण नरकेंच्या लेखानंतर त्यांनी बिनग्रेडी विरोधी लिहिले.
(http://mdramteke.blogspot.com/2011/01/blog-post_29.html)
बिनग्रेडी लोकांचे दाखवायचे दात वेगळे व खायचे दात वेगळे आहेत हे आधीच त्यांच्या लक्षात आले होते आणि नरकेंच्या  लेखातून त्यांना आणखी काही मुद्दे कळले असे ते लेखात लिहितात.
(http://mdramteke.blogspot.com/2011/02/blog-post.html)
त्यांच्याही लेखातील काही मुद्दे:
१. आज चित्र स्पष्ट आहे. मराठा सेवा संघ असो, मराठा महासंघ असो वा संभाजी ब्रिगेड असो. हे सगळे एकाच  माळेचे  मनी आहेत. मराठा हा खेडयापाड्यत दलितांवर अत्याचार करण्यात सगळ्यात वरच्या क्रमांकावर आहे. ओबिसी अन मराठे हे मनुवादयांचे बिनपागारी पोलिस आहेत.
२.बौद्ध समाज सगळ्यात जास्त कुणाकडुन छळल्या जात असेत तर तो मराठा व ओबीसी कडुनच. अशा वेळी Atrocity हा कायदयानी दिलेला बौद्धांचा कवच आहे.
३.हा कयदा आमच्या लाचार अन शोषीत बांधवांचा संरक्षणाचा पिंजरा आहे. ब्रिगेड नावाचा शत्रु आमच्या लोकांचं सोंग घेऊन त्या पिंज-याला तोडु पाहात आहे.

Atrocity चा मुद्दा त्यांना फारच लागला... आणखी एक मुद्दा त्यांना "खटकला", जो नरकेंनी मांडला नाहीये, "जगद्गुरू तुकाराम महाराज", तोही त्यांनी मांडलाय...
४.हिंदुच्या शंकराचार्याला समांतर एक माणुस उभा करायचा म्हणुन तुकारामाला हल्ली जगतगुरुची बिरुदावली लावली जात आहे. निट विचार केल्यावर असं लक्षात आलं की जेंव्हा पासुन बौद्ध बांधवाची ब्रिगेड्शी जवळीक आली तेंव्हा पासुन हे तुकाराम नावाच्या जगतगुरुचा भुत आमच्या लोकांच्या मानगुटीवर बसला.
"जगद्गुरू तुकाराम" हा उल्लेख त्यांना का खटकतो ते त्यांनी "संत तुकाराम जगतगुरु कसे? कोणाचे?" लेखात सविस्तर मांडले आहे. (http://mdramteke.blogspot.com/2011/02/blog-post_1891.html)

वरील मुद्दे हे त्या-त्या लेखकाचे आहेत. मी त्या मुद्यांशी सहमत आहे असे नाही आणि असहमत आहे असेही नाही.
केवळ बिनग्रेडी संघटनेवर त्यांनी का आरोप केले असावेत, त्या संघटनेचे जुने समर्थक असूनही, हे त्यांच्याच मुद्यातून मांडले आहे.
१. बिनग्रेडचा ब्राह्मण-द्वेष जगजाहीर आहे. (ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर)
२. नरकेंना बिनग्रेड मध्ये OBC द्वेष सापडला. (ब्राह्मण, मराठा, OBC आणि दलित)
३. रामटेकेना बौद्ध समाज मराठा आणि obc कडून छळला जातो असे वाटते. बिनग्रेडी लोक त्यांच्या संरक्षणाचा पिंजरा तोडू पाहत आहेत असे त्यांना वाटते. (ब्राह्मण, मराठा, OBC, बौद्ध आणि इतर)

थोडे गट पडले आहेत...
कलीयुगानंतर सत्ययुग येत असले तर वाटचाल कलीयुगाकडेच असते... चालायचंच...

** बाकी रामटेकेचे "अभ्यासपूर्ण" लेखन वाचलेच पाहिजे असे नाही... एकंदरीत सकाळी उठून कोणी तरी धरून त्याच्यावर ताशेरे ओढायचेच असे ठरवून लिहिल्यासारखे वाटते... ते हिंदू नसल्याने हिंदूंचे देव आंदण दिल्यासारखे वापरले आहेत...