Wednesday, August 1, 2012

तिस-या फाळणीच्या दिशेने...

"तिस-या फाळणीच्या दिशेने!" आजच्या म.टा. मध्ये हा लेख आलाय.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/15300939.cms

गेल्या काही दिवसांपासून आसामशी संबंधित ज्या काही बातम्या समोर येत आहेत त्याबाबत हा लेख आहे.
त्यातील काही मुद्दे:
१. कोकराझार जिल्ह्यातील बोडो आदिवासी व मुस्लिम समुदाय यांच्यातील संघर्षात कालच्या ६ आणि १९ जुलै रोजी दोन अल्पसंख्याक व्यक्तींची हत्या करण्यात आली. त्यास प्रत्युत्तर म्हणून २० जुलै रोजी ' बोडो लिबरेशन टायगर्स ' च्या चार माजी सदस्यांना निर्घृणपणे मारण्यात आले
२. गोसाई गावाच्या सरहद्दीत हावरियापेठ हे एक गाव आहे. या गावात कालिमाता मंदिराच्या परिसरात घुसखोरांनी मदरशासाठी बेकायदेशीर प्रसाधनगृह बांधण्याचा जबरदस्तीने प्रयत्न केला. याच्या विरोधात दोन बंगाली तरुणांच्या नेतृत्वाखाली गावकरी एकत्र आले. या तरुणांची हत्या झाली.
३. यानंतर तीन महिन्यांपूर्वी , बाजारात झालेल्या छोट्या वादंगातून गोसाई गावात बोडो आदिवासींची घरे जाळण्यात आली. या घटनांमागे ' मुस्लिम युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम ' ( एमयूएलएफए) व ' ऑल मायनॉरिटी स्टुडंस् युनियन ' ( एएम्एसयू) या मूलतत्त्ववादी संघटनांचा हात आहे.
शिवाय ' ऑल बोडोलँड मायनॉरिटी स्टुडंस् युनियन ' ( एएम्एसयू) ही संघटना दंगलीमागील मुख्य दोषी असल्याचे अधिकृत सूत्रांचे मत आहे.
४. कोकराझार येथील घटनेत फकिराग्राम येथील वनखात्याच्या जमिनीवर घुसखोरांनी आक्रमण केले व त्यावर इदगाहचा नामफलकही लावला. एबीएमएसयू या संघटनेने मुस्लिम समुदायास जमवून स्थानिक लोकांविरुद्ध आंदोलन सुरू केले.
५. १९७१नंतर आसाममध्ये प्रचंड प्रमाणात बांगलादेशातून घुसखोरी झाली.
६. एच. के. बोरपूजारी हे एक नामवंत इतिहासतज्ज्ञ. त्यांनी १९९८मध्ये ' नॉर्थ इस्ट इंडिया : प्रॉब्लेम्स , पॉलिसिज अँड प्रॉस्पेक्ट्स ' या पुस्तकात पुराव्यानिशी हे सिद्ध केले आहे की बांगलादेशी घुसखोरांनी बोडोलँडमधील बोडोंच्या जमिनी व वनजमिनी बळकावण्याची पद्धतशीर योजना केली असून बोडो व घुसखोरांमधील तणावाचे ते एक मुख्य कारण आहे. आसाममधील वाढती बेरोजगारीही , घुसखोरांनी स्थानिकांच्या उद्योगधंद्यावर मिळवलेल्या कबजामुळे निर्माण झाल्याचा त्यांनी निष्कर्ष काढला आहे. राज्य सरकार व केंद्र सरकारला ही समस्या सोडविण्याची इच्छाशक्ती नाही ; याचे कारण त्यांचे राजकीय हितसंबंध आड येतात.
७. सिल्हेट जिल्हा यापूर्वीच आसामपासून वेगळा झाला आहे


सगळे मुद्दे म.टा. मधले Copy-Paste केले आहेत. दुर्दैवाने ह्या भागाच्या इतिहासाची काहीच माहिती नव्हती आणि नाहीये.
वरील मुद्द्यावरून खूप प्रश्न समोर येतात, अर्थात उत्तरांसहित...

१. जर सगळे मुसलमान अतिरेकी नाहीत हे रडगाणे सरकार कायम गात असले तर घुसखोरीत सगळी नावे मुसलमानांची कशी येतात?
उत्तर: "सगळे मुसलमान अतिरेकी नाहीत" हे जरी खरे असले तरी "सगळे अतिरेकी मुसलमान आहेत" हेही १०० टक्के खरे आहे.
२. पाकिस्तान बरोबर जे काही शांततापूर्ण बोलणीच्या नावाची फालतुगिरी चालते त्याला अर्थ काय? आत्तापर्यंतची फलनिष्पत्ती काय?
उत्तर: अर्थातच काही नसावी. असलीच जर, तर एवढेच म्हणावे लागेल कि शांततापूर्ण मार्गाने त्यांना पूर्ण भारत भेट देण्याऐवजी काश्मीर आणि आसाम पुरतेच थांबू दिले आहे. पण हे अर्थातच वाईटातून चांगले शोधण्यासारखे आहे.
३. आपल्याकडे यासाठी काही उत्तर नाही का?
उत्तर:
   i. आसाम आणि काश्मीर मध्ये घुसलेल्या मुसलमानांपुढे हात जोडून उभे राहायचे, "चले जाव" चे बोर्ड घेऊन, अहिंसेच्या मार्गाने त्यांना तिथून बाहेर पडण्यास सांगायचे. त्यांनी हल्ला/गोळीबार केला तर घाबरून न पळता, गोळ्या खाऊन मरायचे. (मला गांधीजींची जी अहिंसा माहिती आहे, त्यानुसार हाच मार्ग त्यांच्या तत्त्वातून निघतो.)
   ii. "स्वसंरक्षणात्मक शस्त्र हातात घेणे हे अहिंसेच्या (गांधीजींच्या नव्हे!) धोरणातच येते असे मानून किमान आपली भूमी त्यांच्या अतिक्रमणातून सोडवणे.
४. "‘अखंड भारत’गांधींनाच नकोसा!: प्रा. शेषराव मोरे, १७ जून २०१२, लोकरंग"  ह्या लेखाबद्दल फेसबुकवरील "KCBC" नावाच्या ग्रुप वर चर्चा झाली होती काही दिवसांपूर्वी. लेखात मोरेंनी असा तर्क मांडला होता कि गांधीजीनी जाणून-बुजून भारताच्या फायद्यासाठी देशाची फाळणी केली आणि पाकिस्तान/बांगलादेश निर्माण होऊ दिले कारण त्यामुळे उरलेला "अखंड" भारत सुखात राहू शकेल.
अर्थात त्या लेखात, सरदार पटेल, आंबेडकर, नरहर कुरुंदकर यांची मतेही दिली आहेत. मोरेंनी मांडलेल्या तर्कानुसार आता आसाम वेगळा करू. उरलेला भारत सुखात राहील. पण त्यामुळे उद्या अरुणाचल प्रदेश वगैरेवर सुद्धा पाणी सोडावे लागेल का?
उत्तर: कदाचित होय. "फाळणी" हे उत्तर मानले तर ते खिरापत वाटण्यासारखेच होईल. एकामागून एक भूमी जात राहील.
५. १९७१ पासून आसाम मध्ये प्रचंड घुसखोरी झाली. बोरपूजारी यांनी १९९८ मध्ये पुराव्यासहित घुसखोरी आणि दुष्परिणाम सिद्ध केले आहेत (म.टा. च्या बातमीवरून. पुस्तक वाचनात आले नाही.) तरीही त्यावर काही उपाय का योजला गेला नाही?
उत्तर: उत्तरही त्यांनीच दिले आहे. " राजकीय हितसंबंध"! मुसलमानांचे लांगुलचालन राजकारण्यांकडून कायमच होत आलेले आहे, हे काही नवीन नाही.
६. सुप्रीम कोर्टाने रद्द केलेला आय्.एम्.डी.टी. कायदा , काँग्रेस पुन्हा एकदा मागील दाराने आणण्याचा प्रयत्न करीत आहे. काय आहे हा कायदा? त्यावर बंदी का आणली सुप्रीम कोर्टाने? आणि कॉंग्रेस तो परत आणायचा प्रयत्न करत आहे... का?
उत्तर: कायद्याच्या माहितीसाठी:
http://en.wikipedia.org/wiki/Illegal_Migrants_%28Determination_by_Tribunal%29_Act_%28IMDT%29
बाकी, कॉंग्रेस आणि त्यांचे धोरण यावर बोलण्यात काही अर्थ नाही.

मुद्दा खूप मोठा आहे, त्यावर चर्चेलाही अधिक वाव आहेच. पण त्याने काहीही निष्पन्न होणार नाही, सर्वांना इतिहास आणि परिस्तिथी समजण्यापलीकडे.

** मुसलमान शब्दाबद्दल कोणालाही आक्षेप असल्यास लाखो अतिरेकी आणि दहशतवादी यांमध्ये ५ हिंदू अथवा दुसऱ्या धर्माचे लोक दाखवून द्यावेत. शब्द मागे घ्यायला तयार आहे.

No comments:

Post a Comment